७ साखर कारखान्यांना ‘एनसीडीसी’ने कर्ज नाकारले; सरकार फेरप्रस्ताव पाठवणार
कारखान्यांचे कर्ज प्रस्ताव नामंजूर करण्यामागे ‘एनसीडीसी’ने अनेक गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने कारखान्यांचे भागभांडवल कमी असणे, आर्थिक अनियमितता, सलग तीन वर्षे झालेला तोटा, यापूर्वी महामंडळाकडून घेतलेल्या कर्जानंतरही स्थितीत सुधारणा न होणे, तसेच एफआरपी (FRP) आणि शासनाची थकबाकी वेळेवर न देणे यासारख्या कारणांचा समावेश आहे. याशिवाय काही कारखाने भाड्याने चालविण्यास दिल्यानेही त्यांच्या प्रस्तावांवर नकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
